Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

काबूत ठेवा दमा

काबूत ठेवा दमा  सर्दीच्या दिवसात दंम्याच्या रुंगाचा त्रास काही वेळा बळावतो. श्वसनसंस्थेच्या विकारांवर अनेक गुणकारी औषधे होमिओपॅथीत उपलब्ध आहेत . दरम्यान विकारावर गुणकारी औषधे अशी  १)  अर्सेनिक ओलब: - दार वर्षी ठराविक ऋतूत उद्भवणाऱ्या तक्रारींवर हे औषध गुणकारी ठरते . दमा ,निमोनिया  आदींवर उपयुक्त पुढील लक्षणांत या औषधाचा वापर करावा   श्वासनलिका आकुंचन पाऊण रुग्णाला श्वसनाला त्रास होतो . आडवे  पडल्यावर त्रास वाढतो . घुस्मटल्याची भावना होते  मध्यरात्रीनंतर खोकला वाढतो  छातीतून आवाज येतो  रुग्ण मानसिक व शारीरिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ असतो  थोड्याश्या श्रमाने खूप थकवा येणे  आजाराची विशेषतः एकटे असण्याची ,मृत्यूची खूप भीती वाटणे  २) नॅट्रम सल्फ :- दमा ,श्वास घ्यायला त्रास होणे ,छातीतून कफाचा आवाज येणे . विशेषतः पहाटे ४-५ वाजण्याच्या दरम्यान  त्रास होणे  खोकल्यातून चिकट तारेसारखे हिरवे कफ बाहेर पडते . लहान मुलांमधील दम्यावर उपयुक्त दर वेळेला सर्दीचे रूपांतर दम्याच्या विकारात होते .विशेषतः दमात हवा...

सांधे आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे कराच

सांधे आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे कराच  सर्व सांध्याचा नियमित व्यायाम दररोज साधारणतः 5 ते 10 मिनिटे वाचायची TV बघण्याची किंवा संगणकावर कामं करताना बसण्याची पद्धत आदर्श स्थितीच्या जवळ जाणारी हवी ,दार तास दीड तासाला उठून चक्कर मारून या . मानसिक तणाव असेल तर त्यावर सहकाऱ्यांची ,कुटुंबातील व्यक्तींची आणि गरज असल्यास मानसोपचार  तज्ज्ञाची मदत घेऊन मात करा  उतकृष्ट दिसणाऱ्या वस्तू खाण्याऐवजी सकस सात्विक आहार जो तुम्हाला आवडेल तो घ्या .पालेभाज्या , सलाड , फळे खा . 60 वर्षानंतर स्त्री पुरुष दोघांनीही आपल्या हाडांवरील शक्ती किती आहे हे बघण्यासाठी BMD (बोन मिनरल डेन्सिटी) चाचणी अवश्य घ्या  सुट्टीच्या दिवशी आईस्क्रीम पिझ्झा भेळ खाण्यास हरकत नाही पण 30 ते 40 मिनिटे चालत जाऊन ते पदार्थ खा चालणे महत्वाचे  45 वर्षावरील स्त्रियांनी रोज अन्नात कॅल्शिअम युक्त व व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खावेत .रोज कॅल्शिअमची एक गोळी घेणे सुद्धा चांगलेच  शतपावली रोज घ्या  सहस्त्र पावली तर फारच छान  सहा महिन्यातून एकदा 3 ते 4 दिवस सहलीला जा...

हेअल्थ फॅक्टस

हेअल्थ फॅक्टस   जन्माच्या वेळी गुढघ्याच्या सांध्यावर सरंक्षक वाटीसारखे हाड नसते . सहा सात महिन्याचे बाळ श्वसन व गिळणे हे दोन्ही क्रिया एकाच वेळी करू शकतात  इतर ऋतुंपेक्षा उन्हाळ्यात लहान मुलांची वाढ अधिक जोमाने होते  सहा वर्षाखालील मुलांना होणाऱ्या विषबाधेचे कारण बहुतेक वेळा घासण्याचा साबण असतो  आपण सध्या खातो ते टोमॅटो केचअप  १९३० मध्ये औषध म्हणून विकले जात असे  निळ्या रंगाचे डोळे असणाऱ्यांना अंधारात अधिक स्पष्ट दिसते  आपल्या शरीरातील प्रमुख मूलद्रव्ये :- ऑक्सिजन 65 टक्के ,कार्बोन 18 टक्के ,हैड्रोजेन 10 टक्के , नाइट्रोजेन 3 टक्के ,कॅल्शिअम 2 टक्के,फॉस्फरस 1  टक्का व इतर1  टक्के . वेदनेचे संदेश शरीरातून 350 फूट प्रति सेकंड या वेगाने प्रवास करतात . आपल्या थुक्कीचा उत्कलनांक पाण्याच्या उत्कलनांकापेक्षा तिप्पट आहे . बहुतेक अल्कोहोलयुक्त द्रावणामध्ये मानवी जीवनास आवश्यक सर्व 13 क्षार असतात 

पाऊसाचा धडा गाथा पावसाच्या

पाऊसाचा धडा  गाथा पावसाच्या  पाऊसआला कि निसर्गात अनेक किमया घडतात  हिरवा शालू परीघ केलेली धरती ऐन इंद्रधनुष्याचे मंगल तोरण नभोमंडपी लावेल जाते. त्याविषयी आपण कविता वाचतो आणि निबंध लिहितो .  पण बारकाईने पारोसारच अवलोकन केलं कि नदीकाठच्या दलदलिताही शेताच्या बांधावरती आणि ओलेत्यामधील कुठेही बिळे पाण्याने भरून गेलेली पाहतो . त्या बिळातून सॅप नाग आणि विंचू भरा भरा बाहेर निघतात ! हे दृश्य पाहून नेहमीच मनाची आठवण येते . ज्याप्रमाणे बिळे पाण्याने भरली कि असे प्राणी बाहेर पडतात त्याप्रमाणे मनावर ताण पडला , संकट आला कि मनोभूमीतून कुठेतरी खोलवरच्या बिळात दडलेले नकारात्मक विचार बाहेर पडतात. जसे साप आणि विंचू इकडे तिकडे फिरून आपल्याला घबरावतात तसे हे नकारात्मक विचार मनात धुमाकूळ घालतात. त्या नकारात्मक विचारांच्या अशा इतस्ततः फिरण्यामुळे आपण भेदरून जातो .  निसर्गमित्राशी संवाद साधला तर ते त्यांपैकी बरेचसे साप बिनविषाचे असतात, असं आवर्जून सांगतात .त्यांच्या वाटेल जाऊ नका ते आपापल्या वाटेने जातात . त्यांच्या मागे लागलं तर ते उलटून येतात ,असं त्यांचं आग्रहाचं म्हणणं...

उपकार दुधाचे

 उपकार दुधाचे  ह्यदयविकार ,उच्च रक्तदाब ,रक्तातील वाढते कोलेस्टेरॉल मधुमेह अश्या जिव्हेन्य व्याधींना  कारण ठरणारा "मेटाबोलिक सिंड्रोम " दूर ठेवायचा असेल तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना पर्याय नाही  असे ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठाच्या तज्ञानी म्हंटले आहे  दुग्धजन्य पदार्थामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते मात्र हे अत्यंत गुंतागुंतीचे अण्णा असल्याने त्याचे बरेच चांगले परिणामही शरीरावर दिसून येतात    असे या तज्ञानी  जर्नल ऑफ एपिडेमियॉलॉजि अँड कोम्मुनिटी हेअल्थ या नियतकालिकात म्हंटले आहे  . दूध आणि मेटाबोलि सिंड्रोम यांतील परस्पर संबंध शोधून काढण्यासाठी या तज्ञानी  45 ते ५९ या वयोगटातील मधुमेह नसलेल्या २३७५ पुरुषांच्या आरोग्याचा अभ्यास केला  अभ्यासाच्या सुरुवातीला या सर्वांकडून त्यांच्या आहाराबाबत सविस्तर माहितीमिळणारी एक प्रश्नावली भरून घेण्यात आली . त्यानंतर पुढील वीस वर्षे त्यांच्यातील मधुमेह , ह्यदयरोग ,ह्यदयविकाराचा झटका आदी रोगांचा मग ठेवण्यात आला . ज्यांच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण अधिक हो...

आपण निरोगी आहेत ? ओळखा आयुर्वेदाच्या मदतीने

आरोग्य म्हंजे काय ? तुम्ही म्हणाल आजारी नासाने म्हणजे निरोगी असणे ! तुमची आरोग्याची संकल्पना चुकीची आहे, हे तुमच्या उत्तरावरूनच समजते . आयुर्वेद हे एक वैद्यकीय शास्त्र आहे जेथे रोगाच्या आधी आरोग्याचा विचार केला जातो, रोग होऊच नये म्हणून काय करावे ते सांगितले जाते  . निरोगी असणे शारीरिक तसेच मानसिक पातळीवर देखील महत्वाचे मानले जाते आयुर्वेद शास्त्र सांगते कि तुमचे शरीर व मन प्रसन्न असेल तरच तुम्ही healthy  व सुखी आहत काही गोष्ट आहेत त्यावरून तुमचे शरीर व मन प्रसन्न आहे कि नाही हे तुमचे तुम्हीच ठरवू शकता . आरोग्याची लक्षणे कोणती? कडकडून भूक लागणे अण्णा व्यवस्थित पचणे म्हणजेच आंबट , करतात ढेकर न येणे ,गॅसचा त्रास ना होणे कोणतेही सारक चूर्ण ना घेता स्वचास जाणे मालविसर्जनानंतर पॉट हलके वाटणे रात्री गाढ झोप लागणे रात्री मध्येच जग न येणे जाग आल्यानंतर लोळावेसे न वाटणे मनामध्ये सतत सकारात्मक भावना असणे नकारात्मक भावना नसणे म्हणजेच सकारात्मक भावना सध्या आपल्या मनामध्ये नकारात्मक भावनाच जास्त येतात उदा.सकाळी उठल्या बरोबर आज ऑफिस ला दांडीच मारावी , कशाला सकाळीच क...

जायच का पुन्हा खेड़यात..

जायच का पुन्हा खेड़यात.. दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर. पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही विशेष नव्हतंच. आणि तरीही फी मात...

परप्रांतीय

परप्रांतीय  द्वारकानाथ संझगिरी  एके काळी ‘परप्रांतीय’ हा शब्द फार प्रेमाने उच्चारला जात नव्हता. आज मात्र तो शब्द करुणेने ओथंबलेला आहे. ती सात महिन्याचं बाळ पोटात घेऊन कसारा घाट चढणारी बाई. ती कडकडीत उन्हात चालणाऱ्या बापाला बिलगून दूरवरच्या घराकडे निघालेली लहान मुले. तो लखनौच्या रस्त्यावर आईला पाठीवर घेऊन स्वतःचं घर शोधत निघालेला मुलगा. चालताना दमुन रुळावर झोपल्यावर तिथेच मालगाडीखाली चिरडून मेलेली माणसं. अशी अनंत दृश्यं वाईट स्वप्नाप्रमाणे पुन्हापुन्हा आपल्याला छळतात. त्या प्रत्येक दृश्यात मी स्वतःला, माझ्या बायकोमुलांना, सुनांना, नातवांना उभं करून पाहिलं आणि माझा बांध फुटला. न पाहिलेल्या माणसासाठी डोळ्यात अश्रू फार कमी वेळा येतात. पण दगडानेसुध्दा ढसाढसा रडण्याची ती दृश्यं होती. जगापुढे ही दृश्यं ही आपल्या देशाची चांगली जाहिरात नव्हती. महासत्ता व्हायची इच्छा असणाऱ्या देशाला हे ललामभूत नव्हतं. ह्यात केंद्र किंवा राज्य सरकारचं किती चुकलं ह्या राजकीय धुळवडीत मला सामील व्हायचं नाही. पण एक गोष्ट मला पुन्हा एकदा पटली की कुणी ह्या देशात गरीब मजूर म्हणून जन्माला येऊ न...

कोरोना महामारी काहि महत्वाच्या टिप्स :-

कोरोना महामारी मुळे प्रत्येक व्यक्ती समोर अनेक समस्या असणार परंतु डगमगु नका हिंमत सोडू नका अचानक कंपनी बंद पडणं , जॉब जाणं व्यवसाय अडचणीत येणं उत्पन्न एकदम कमी होण हे कोणाच्याही आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण हिंमत हारू नका ! कोरोना महामारी मुळे प्रत्येक व्यक्ती समोर अनेक समस्या असणार परंतु डगमगु नका हिंमत सोडू नका अचानक कंपनी बंद पडणं , जॉब जाणं व्यवसाय अडचणीत येणं उत्पन्न एकदम कमी होण हे कोणाच्याही आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण हिंमत हारू नका ! मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा फोर व्हीलर वापरत असाल टू व्हीलर घ्या चारिठाव स्वयंपाक होत असेल फक्त पोळी-भाजी वर या  काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा ! नातेवाईकाला शिव्या देऊ नका फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका ! शंभर पैकी द...

अणुकचरा म्हणजे काय ?

आजची माहिती  अणुकचरा म्हणजे काय ?  अणुभट्टीत इंधन म्हणून युरनियमचा वापर केला जातो. जेव्हा युरेनियमच्या अणूचे विभाजन होते तेव्हा दोन मध्यम भाराच्या मूलतत्त्वांचा उत्पादन होते. बहुतांशी ही मूलतत्त्वे बेरियम व क्रिप्टॉन ही असतात. पण इतरही मुलतत्वांचे उत्पादन होऊ शकते. ही सारी किरणोत्सर्गी असतात व लक्षावधी वर्षे ती तशीच राहू शकतात. त्यांचा इतर काहीही उपयोग नसल्यामुळे त्यांना अणूकचराच मानले जाते परंतु त्यांचे प्रमाण फार नसते. परंतु या अणुविभाजनाच्या अभिक्रियेत इतरही किरणोत्सारी पदार्थांचे उत्पादन होत असते.  निसर्गात जे युरेनियम मिळते त्यात युरेनियमची २३५ व २३८ या दोन अणुभाराची समस्थानके असतात. यापैकी फक्त २३५ अणुभाराच्या युरेनियमच्या अणूंचेच विभाजन होऊ शकते; पण त्यांचे प्रमाण केवळ ७ दशांश टक्के असते. म्हणजे एक किलोग्रॅम युरेनियममध्ये सातशे ग्रॅम असते. उरलेल्या ९९.३ टक्के युरेनियमचे विभाजन होऊ शकत नाही; परंतु या युरेनियमकरवी अतिरिक्त न्यूट्रॉनचे शोषण होत असते. त्यापायी त्याचे किरणोत्सारी प्लुटोनियममध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणजेच उपयोगी अशा संपूर्ण युरेनियमचे विभाजन झाल्...

"उधार चा श्रीमंत " एक संवेदनशील घटना

"उधार चा श्रीमंत "   लेखक-अनामिक.       100 नम्बर फिरवल्यावर येणारी पोलिस गाडी मेनरोड वर एका दोन मजली बंगल्यासमोर येऊन थांबली.       काॅंस्टेबल हरीश यांना फोन वर याच घराचा पत्ता दिला गेला होता. पण येथे तर चांगल्या घरांची वस्ती होती. येथे जेवण कुणी मागवले असणार? हाच विचार करत हरीश यांनी त्या नंबर वर काॅलबॅक केला.        "आत्ता दहा मिनिटांपुर्वी याच नंबर वरुन जेवण मिळावे म्हणून फोन आला होता. आपण जतीन बोलत आहात का? आम्ही बंगला नंबर ११२ च्या समोर उभे आहोत. येथून कुठे यायचं आहे?       दुसऱ्या बाजूने आवाज आला, "तुम्ही तेथेच थांबा, मी येतो."     एका मिनिटांनंतर ११२ नंबरच्या बंगल्याचे गेट उघडले आणि पासष्ट वर्षांच्या जवळपास वय असलेली एक व्यक्ती बाहेर आली.       त्यांना बघताच हरीश यांना राग आला व म्हणाले, "तुम्हाला लाज नाही वाटत, असे फोन करून जेवण मागवायला? गरीबांच्या हक्काचे जेवण तुमच्या सारखे श्रीमंत खातील तर गरीबांपर्यंत अन्न कसे पोहोचेल? आमची एवढी मेहनत वाया गेली."     ...

" औषध संशोधनाकडे होणारे दुर्लक्ष सगळ्या जगाला महागात पडले".

जगभरातील कोरोना व्हायरसमुळे होणारे अगणिक मृत्यू ऐकून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  " औषध संशोधनाकडे होणारे दुर्लक्ष सगळ्या जगाला महागात पडले".  👉अमेरिकेतील नामांकित Virology संस्थेच्या प्रमुखाचा TV interview चालू होता ज्या वेळी त्याना प्रश्न विचारण्यात आला कि, काही महिने झाले करोना व्हायरस येऊन अजून का औषध किंवा लस का निघाली नाही? त्यांनी हसत उत्तर दिले तुम्ही आठवून बघा, एखाद्या Research Scientist चा शेवटचा interview तुम्ही कधी घेतला (उत्तर:कधीच नाही). तुमचे लाडके राजकारणी, खेळाडू, सेलेब्रिटी घरात बसलेत त्यांची तुम्हाला फार काळजी आहे, त्यांच्या घरात बसण्यामुळे तुमचा धंदा कमी झालाय. आम्ही आमच्या प्रोटोकॉलप्रमाणे आमचे काम करणार. एका रात्रीत काही चमत्कार होणार नाही.  👉 ह्याच Scientist ने TV interviewer ला एक प्रतिप्रश्न केला, 'एलिस ग्रॅनॅटो' ही व्यक्ती कोण आहे? आणि TV interviewer बराच विचार करून उत्तर आले नाही. कदाचित आपल्यापैकी ही कोणाला माहीत नसेल.  👉' एलिस ग्रॅनॅटो ' ही कोरोना व्हायरसची संशोधित लस टोचून घेणारी जगतातील पहिली महिला कोणी ग्लॅमर अस...

एकदा तरी वाचा मनोज गांगल यांची गाथा विलगीकरण

मनोज गांगल मी आणि माझे कुटुंब अमेरिकेत गेले ५० दिवस स्वतःहून विलगीकरणात आहोत. जवळपास १० वर्षे जर्मनीत नोकरी निमित्त काढल्यामुळे मी अनेक जर्मन मित्रांच्या सुद्धा संपर्कात आहे.  अमेरिका, जर्मनी आणि भारत ह्या तिन्ही देशातील लॉक डाऊनची  जर तुलना करायची झाली तर ह्या काही गोष्टी मी लिहू शकतो.  अमेरिकेत अनेक लोकांना लॉक डाऊन मान्य नाहीये. ते नाही पाळले तर त्यातून उदभवणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव आहे ... पण सरकारने लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने न आणता परिस्थिती काबूत आणावी अशी त्यांची मागणी आहे.  लवकरात लवकर लॉक डाऊन संपून नोकरी व्यवसाय परत चालू व्हावेत अशी मुख्य मागणी मोर्च्यांतून, मुलाखतींतून वगैरे असते.  दुसरे म्हणजे, चीन ने आपली अर्थव्यवस्था नष्ट करायला हा विषाणू तयार केला असावा अशी एक शंका इथे आहे.  त्यामुळे ह्या प्रकाराकडे एक आक्रमण किंवा युद्ध म्हणून बघावे आणि तसे असेल तर आपली अर्थव्यवस्था कदापिही ढासळू द्यायची नाही, मग त्यासाठी कितीही मनुष्य हानी झाली तरी चालेल असा एक मतप्रवाह आहे. युद्धात मनुष्य हानी होतेच, ती सहन करायची आणि अर्थव्यवस्था शाबूत...

समाजाने आता बदललेच पाहिजे Point 18 be noted

समाजाने आता बदललेच पाहिजे Point 18 be noted १.  पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.* २.   कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.  ७. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम) 8 आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्र...

विषयच लय हार्ड आहे

विषयच लय हार्ड आहे🤨 "महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्यांना काम नाही, बाहेरचे येऊन काम घेतात!" असेच तुम्ही ओरडत होता ना..??  आता ते तर पळाले.  आता प्लॅनिंग करायला घ्या ते यायच्या आत, आपण आता कोणता धंदा सुरू करू शकतो... - टॅक्सी चालवू शकता,  - कपड्यांना इस्त्री करू शकता,  - रंग काम, POP काम, फर्निचर करू शकता (खूप पैसा आहे यात, साईट वरचे कॉन्ट्रॅक्टर तर मस्त हाय एन्ड कार ने फिरतात, त्यांच्या कामगारांना ५०० - १५०० रोज पगार आहे, ते आपापल्या स्किल वर अवलंबून असते...फक्त खूप मेहनत करावी लागते "घड्याळ घरी ठेवून", कमिटमेंट पाळाव्या लागतात, आणि सर्वात महत्वाचे, फोन उचलावे लागतात) - पाणीपुरी विकू शकता (भरपूर पैसा आहे यात) - कच्छि दाबेली,  वडापाव विकू शकता,  सॅन्डविच विकू शकता  (एक हातगाडीवाला - रोज किमान १०० प्लेट विकतो x रू.१५ = १५००, किमान ५०% मार्जिन आहे = ७५० x ३० = २२५०० रु. महिना खिशात) हे किमान आहे बरं का लक्षात ठेवा.... किमान....  तसे तर काहीजण ५००-५०० प्लेट विकतात रोज.... किमान. वडापाव विकणे म्हणजे काय साधे काम नाही,  वडापावच्या...

वाचनात आलेली एक पोस्ट मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल..

वाचनात आलेली एक पोस्ट मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं  ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.  हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.  मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात का...

चुटपुट कामाच्या गोष्टी

चुटपुट ... डॉ.श्रीकांत तारे. माझी आई सतत काहीतरी वाचत असायची. सुदैवाने तिच्या प्रयाणापर्यंत म्हणजे तिच्या पंचाहत्तरीतही तिची नजर शाबूत होती.  कुठलंही पुस्तक, वर्तमानपत्राची पुरवणी, कचर्‍यात पडलेला एखादा चिठोरा किंवा कुठल्याही एखाद्या   कागदावर काही काळं उमटलं असू दे, आई ते वाचायला घ्यायची. वाचनाचं वेडच होतं तिला.  रविवारी विविध वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आमच्याकडे येत असत. हा दिवस तिच्यासाठी पर्वणी असे. घरकाम करता करता ती मधूनच काहीतरी वाचून घ्यायची. अगदी गॅसवर उकळणारी आमटी ढवळताना सुद्धा पुलंचं एखादं पुस्तक वाचताना मी तिला बरेचदा बघितलं आहे. विनोदी काही वाचून ती खदखदून हसायची. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची. गंभीर काहीसं वाचलं की गंभीर व्हायची. मनांत खोलवर काही जाणवलं की तिच्या डोळ्यात ढग दाटायचे. रणजीत देसाईंचं ‘स्वामी’ वाचताना, पुलंचं ‘फसवणूक’ चाळताना किंवा मल्लिका अमरशेखांचं ‘मला उध्वस्त व्हायचंय’, पचवताना आईला आम्ही वेगवेगळ्या भावनांच्या सरीत चिंब भिजताना कितीतरी वेळा बघितलंय. काही वाचताना त्या लेखनाशी एकरूप होणं तिला कसं काय जमायचं देव जाणे, पण त्या लेखन...