Skip to main content

विषयच लय हार्ड आहे

विषयच लय हार्ड आहे🤨

"महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्यांना काम नाही, बाहेरचे येऊन काम घेतात!" असेच तुम्ही ओरडत होता ना..??
 आता ते तर पळाले. 
आता प्लॅनिंग करायला घ्या ते यायच्या आत, आपण आता कोणता धंदा सुरू करू शकतो...

- टॅक्सी चालवू शकता, 

- कपड्यांना इस्त्री करू शकता, 

- रंग काम, POP काम, फर्निचर करू शकता (खूप पैसा आहे यात, साईट वरचे कॉन्ट्रॅक्टर तर मस्त हाय एन्ड कार ने फिरतात, त्यांच्या कामगारांना ५०० - १५०० रोज पगार आहे, ते आपापल्या स्किल वर अवलंबून असते...फक्त खूप मेहनत करावी लागते "घड्याळ घरी ठेवून", कमिटमेंट पाळाव्या लागतात, आणि सर्वात महत्वाचे, फोन उचलावे लागतात)

- पाणीपुरी विकू शकता (भरपूर पैसा आहे यात)

- कच्छि दाबेली,
 वडापाव विकू शकता,
 सॅन्डविच विकू शकता 
(एक हातगाडीवाला - रोज किमान १०० प्लेट विकतो x रू.१५ = १५००, किमान ५०% मार्जिन आहे = ७५० x ३० = २२५०० रु. महिना खिशात)
हे किमान आहे बरं का लक्षात ठेवा.... किमान....
 तसे तर काहीजण ५००-५०० प्लेट विकतात रोज.... किमान.
वडापाव विकणे म्हणजे काय साधे काम नाही,
 वडापावच्या गाड्यांवर इन्कमटॅक्सच्या रेड पडल्याचा पुण्याचा इतिहास आहे... माहिती आहे ना?

फळं, भाज्या विकू शकता, लिंबू पाणी, कैरी पन्हे, ताक, मट्ठा, पापड़, लोणचे, पान विकू शकता, केवढं मार्जिन आहे यात...

करायचं म्हटलं तर कसाही पैसा कमवू शकता,

आता आपला पुण्यातील कल्याण भेळवाला, रस्त्यावर भेळेची गाडी होती म्हणतात पूर्वी, पण क्वालिटी देऊन देऊन आज कितीतरी AC फ्रांचायजीज आहेत भेळेच्या... विचार तरी केला होता का किमान ४०० sq.ft. AC भेळ रेस्टॉरंट???

मानकर डोसा वाले... ठिकठिकाणी,

येवले चहा,
चितळे - यांच्या फ्रांचायजी बद्दल काय बोलणे!

बेडेकर मिसळ, श्रीकृष्ण मिसळ, काटाकीर मिसळ वाले..

ज्याला ज्या पद्धतीची चव आवडते तिकडे तो मिसळ खायला जातो.

देसाई आंबेवाले, म्हणजे फळवालेच ना?
दरवर्षी फक्त...  बरं का फक्त ११००० आंबे दगडूशेठ गणपतीच्या चरणी दान करतात... ११००० आंबे दान कशाला म्हणतात??

अजून काय काय उदाहरणे देऊ???

दुर्गा कॉफी, किती फ्रांचायजी आहे यांच्या???? किती मोठे झाले???

ही सर्वच्या सर्व मराठी माणसे आहेत ना? छोट्यातुनच मोठे झाले आहेत हे सगळेच्या सगळे, आयते काही नाही मिळाले यांना. हातावर हात धरून कोणीतरी मदतीला येईल म्हणून नाही बसले... स्वतः उठले, ध्येय ठेवले, मेहनत केली, योग्य प्रकारे पैशांचे व्यवहार ठेवले, व्यवस्थित व्यवसायात इन्व्हेस्ट करून पैशाने पैसा जोडला...
फक्त तीनच नियम पाळले यांनी... #क्वालिटी #साफसफाई #वर्षानुवर्षेतीचचव आणि माऊथ पब्लिसिटी...

यश लगेच मिळत नाही, वेळ लागतो... 
एका रात्रीत मिळालेले यश लगेच संपते, पण वेळ लागून मिळालेले यश कायम टिकते...

तर,
कारणं सांगत बसू नका... आणि रडत तर अजिबात बसू नका, कोणीही येणार नाही मदतीला... 
आपल्या लोकांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक म्हणजे नेत्यांच्या मागे दादा, ताई साहेब, भाऊ, अण्णा करत वेळ घालवणे..
अरे काय सेल्फ रिस्पेक्ट प्रकार आहे की नाही???

लोकं बाहेरून येऊन आपल्याकडे काम करून पैसे कमावतात तर आपणच कुठेतरी कमी पडतोय का?
मेहनत सोडून एकमेकांचे पाय खेचण्यात वेळ कशाला घालवता ?
आणि रुबाब काय संपत नाही आपला...?

मी हे, मी ते... आपल्याशी वाकडं .. नदीवर लाकडं यातच आपण रुबाब मानतो, फुशारकी मारतो, व्यवहार नीट ठेवत नाही, फोन बंद असतात, कमिटमेंट नसतात... 

टॅक्स नाही भरणार तुम्ही, पुन्हा पुन्हा सांगतोय, टॅक्स नाही भरला तर तुम्ही मोठेच होणार नाही कारण बँकवाले उभे पण नाही करत बिजनेस लोन लागले तर... फाईल स्ट्रॉंग करा आपली...जास्त सेव्हिंग करा.

दर महिन्याला ८०-२० फॉर्म्युला वापरा खर्चाचा...
महिन्याचे इन्कम पैकी २०% सेव्हिंग झालेच पाहिजे, म्हणजे २०००० इन्कम असेल तर किमान ४००० सेव्हिंग झालेच पाहिजे आणि ८०% म्हणजे १६००० यातच काय घराचा खर्च, लाईट फोन बिल आणि इतर खर्च झाला पाहिजे, 
नाहीतर पगार २०००० आणि फोन ८०००० चा... फालतूचा रुबाब मिरवण्यापेक्षा थोडे सदाशिवपेठी बना, फालतू खर्च नाही करत ते,
 लाजायचं नाही पैसे साठवताना...

हे बदलले तर काहीतरी होईल, हात पसरवायची वेळ येणार नाही... 

आता चान्स आहे काम मिळवायचा.. परत उगाच मंदी बींदी तसले काहीच नसते, किती ही मंदी मंदी केले तरी लोकं जेवायचे, जिभेचे चोचले पुरवायचे थांबवत नाहीत... गरजेच्या वस्तू घेण्याचे थांबवत नाहीत...

आपल्या अपयशाला आपणच जबाबदार हे जेव्हां माहिती होईल तेव्हां सक्सेस मिळेल, कायमच आपल्या अपयशाचे खापर कायम दुसऱ्यांवर फोडू नका, ही काय शाळा नाहीये आजारी होतो म्हणून मार्क कमी पडले म्हणायला...

एकमेकांचे पाय खेचणे वृत्ती बंद करून स्वतःची रेषा मोठी करायचा प्रयत्न करा, स्वतःची एक स्पेशालिटी बनवा, आपल्या शिवाय ऑप्शनच नको कोणाला असे काहीतरी स्वतःचे स्थान निर्माण कराल तर श्रीमंत व्हाल नाहीतर काय खरं नाही, रडतच बसाल काम नाही, पैसे नाही करत....

आणि जरा सौजन्याने आणि गोड बोलायला शिका, आणि खोटे बोलून लोकांना तात्पुरते खूष करण्यापेक्षा किंवा तात्पुरता खिसा भरण्यापेक्षा स्पष्ट बोलायला शिका, ग्राहकांना स्पष्ट बोलणारे दुकानदार जास्त आवडतात...

संधीचा फायदा घ्या,
मदतीला कोणी येणार नाही,
कष्ट करण्यास लाजू नका,
यश तुमचेच आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

करा फॉरवर्ड...🤷🏻‍♂️झाले जागे ... तर झाले कल्याण

Comments

Popular posts from this blog

Top Business Ideas which make you rich fastest

Top Business Ideas which make you rich fastest   be a richest within time  Invest in index funds for long-term growth. Investing in index funds allows you to diversify your portfolio and gain exposure to a broad      market index, aiming for long-term growth by tracking the performance of the overall market. Build and monetize a successful YouTube channel. Creating engaging video content on YouTube and building a substantial subscriber base can lead to monetization through ads, sponsorships, and partnerships, providing a potential income stream. Develop and sell software or mobile apps. Designing and developing software applications or mobile apps can be lucrative if you create a product that fulfills a need in the market and successfully market and sell it. Invest in rental properties for passive income. Investing in real estate properties and renting them out can provide a steady stream of passive income through rental payments, along with potential property ...

केळीच्या सालीचे फायदे -

 केळीच्या सालीचे फायदे -   १) केळाच्या सालीचा आतील भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. २)  पिकलेल्या केळाची साल दातांना लावली तर दातांचा पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतात. ३)  केळाची साल हळूवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहऱ्यावरील मुरूमे, पुटकूळ्या नाहीशा होण्यास मदत   होते. केळाच्या सालीत अँटि-आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेंटेशन, वांग, डाग, दूर होतात. ४)  केळाच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात ॲलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतात. ५)  एखाद्या मधमाशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळाची साल बारीक करून लावल्यास आराम पडतो. ६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर. त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळाची साल लावावी, आराम पडतो. ७) त्वचेवर कोठेही मोस किंवा चामखिळ असल्यास केळाची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मोस, किंवा चामखिळ निघून जाते. ८) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी केळाची साल डोळ्यां...

शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे*

 शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे* तुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात, आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे 300 रोगांचा उपचार केला जाऊ शकतो, शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या या भाजीचे काय फायदे आहेत चला पाहू. यामध्ये खालील पोषक तत्व विटामिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, C पोटैशियम डाइटरी फाइबर वाटर कार्बोहाइड्रेट प्रोटीन सोडियम जिंक और फास्‍फोरस कैल्शियम आयरन हाडांसाठी फायदेशीर शेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल. डायबेटीस मध्ये फायदेशीर जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी क...